कानपूरमध्ये बस आणि टॅम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

कानपूर (उत्तर प्रदेश) – येथे टॅम्पो आणि बसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रॅवल्स बसने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात तब्बल १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या जखमी रुग्णांवर लाला लाजपत राय रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कानपूरचे पोलिस अधिकारी अष्ठभुजा प्रसाद सिंघ यांच्या माहितीनुसार, कानपूरच्या सचेंडी पोलीस स्टेशन अंतर्गत रतन खेडा येथे मंगळवारी कानपूर- इटवा महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या महामार्गावर भरधाव येणाऱ्या एका ट्रॅव्हल बसने टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरादार होती की नियंत्रणाबाहेर गेलेली बस महामार्गाच्या कडेला जाऊन आदळली. यानंतर पलटी होऊन खड्ड्यात पडली. या अपघातात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ अपघातग्रस्ताने उपचारांदरम्यान आपले प्राण सोडले.

kanpur

दुर्घटनाग्रस्त ट्रॅव्हल्स बस कानपूर येथून अहमदाबादच्या दिशेने जात होती. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की साचेंदी येथील बिस्किट फॅक्ट्रीत काम करणारे कर्मचारी हे टेम्पोतून प्रवास करत होते. हे सर्वजण फॅक्ट्रीत जात होते. टेम्पोमध्ये बसलेल्या सर्वाधिक प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करत अपघातातील मृतांच्या वारसाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या वारसांना २ लाख रुपये आर्थिक मदत दिली आहे तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here