दोंडाईचा (प्रतिनिधी) : गेल्या तीन चार महिन्यापासुन दोंडाईचा शहरात दोन दिवसा आड होणारा पाणीपुरवठा सहा साथ दिवसा नंतर होत आहे, वेगवेगळी कारणे दाखून शासकीय कर्मचारी व स्थानिक प्रशासन टाळाटाळ करत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना यांचा प्रचंड त्रास होत आहे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांन कडे कोरोना विषाणू मुळे खायला देखील पैसे नाहीत तर ते पिण्याच्या पाणी विकत घेऊन कस पिणार हा मोठा प्रश्न आहे, तरी लवकरात लवकर आपण शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करावा आशे निवेदन दोंडाईचा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निकम यांना दिले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शैलेश सोनार,युवसेनेचे तालुका प्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, शिवसेनेचे शहर संघटक राका शेठ,उपशहरप्रमुख चुडामान बोरसे,आबा चित्ते, विजय वाडील,चेतन साबळे,संदिप तिरमले,महिला आघाडीच्या विजय ठाकुर, सुनंदा पवार आदी उपस्थित होते…



