साखरपुड्यात जेवणावरून वाद

marhan

पुणे – पुण्यातील खडकी येथील वाकडेवाडीत साखरपुड्यातील जेवणावरून वाद झाला. महिलेसह तिघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक केली आहे.

गौरी शेख (वय २२, राहणार वाकडेवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी शेख या शेजारी असलेल्या नातेवाइकांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी रविवारी रात्री गेले होते. त्या कार्यक्रमाला गौरी शेख यांचे इतर नातेवाइकही आले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर तक्रारदार जेवायला गेले. पण जेवण संपत आले होते.

त्यावरून मुलीचा नातेवाइक हा सईद शेख याला शिवीगाळ करू लागला. तक्रारदाराने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने आणि इतर नातेवाइकांनी मिळून गौरी शेख आणि मजिद मेहबुब खान, सौकत मजिद खान यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वारही केले. त्यानंतर जाताना धमकीही दिली.

या घटनेनंतर गौरी शेख यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शौकत नबू शेख, निसार पांगू खान यांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here