धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – वादळी वाऱ्यासह नुकसान झालेल्या शेमळदा ता.मुक्ताईनगर शेती बांधावर जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनेसह पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या. तसेच लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवुन देण्यासाठी आश्वस्त केले.









