यावलला चार लाखांसाठी तिघांनी आवळला तरुणाचा गळा

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चितोडा गावातील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) या तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, चार लाख रुपये उसनवारीच्या कारणावरुन एका महिलेसह तिघांनी मनोजचा गळा आवळुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर सोमवारी मध्यरात्री कल्पना शशिकांत पाटील (रा. चितोडा) या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

 

मृत मनोज याचा प्लॉट, शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. कल्पनाला गजर असताना त्याने 4 लाख रुपये उसनवारीने दिले होते. याच पैशांनी त्याचा घात केला. मृत मनोजच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

 

 

याबाबत समजलेली घटना अशी की, मृत मनोज यांनी कल्पना पाटील हिला चार लाख रुपये उसनवार दिले होते. हे पैसे अनेक दिवसांपासून ती परत करत नव्हती. दरम्यान, मनोजने पैशांसाठी तगादा लावला होता. याच कारणावरुन कल्पनाने रविवारी रात्री पैसे परत करण्याच्या बहाण्याने मनोजला चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात बोलावून घेतले. अंधारातच दोन साथीदारांच्या मदतीने कल्पनाने दोरीने मनोजचा गळा आवळुन खून केला.

 

खूनानंतर सर्वजण घटनास्थळावरुन पसार झाले होते. सोमवारी सकाळी मनोजचा मृतदेह आढळुन आला होता. यानंतर यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवली. मनोजला घरातून कोणी बोलावले? याचा शोध घेतला असता कल्पनाचे नाव समोर आले. त्यानुसार सोमवारी दुपारीच तिला ताब्यात घेतले होते. अधिक चौकशी केली असता रात्री उशिरा तिने खूनाची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here