मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मतदारसंघातील १८२ गावात जाऊन तेथील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या एकतिसाव्या दिवशी रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कासारखेडा, वढवे, माळेगाव, सारोळा येथील ग्रामस्थां सोबत संवाद साधला.
सारोळा येथे टाळ मृदुंगाच्या गजरातदिंडी काढून , फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी करून ग्रामस्थांनी जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. यावेळी रोहिणी खडसे यांच्या सोबत यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे,तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, माजी सभापती विलास धायडे, राजेंद्र माळी,यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील,वक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, जिल्हा उपाध्यक्ष अतुल पाटील, जि प सदस्य निलेश पाटील,तालुका सरचिटणीस सुनिल काटे,विनोद काटे, विलास पाटील,नंदकिशोर हिरोळे,लता ताई सावकारे, विकास पाटील,संजय माळी,राजेश चौधरी, आर डी पाटील,नामदेव पाटील,नारायण पाटील, समाधान पाटील,राजेंद्र पाटील,रविंद्र पाटील,जे के चौधरी,श्रीराम चौधरी,सोनु पाटील, विशाल रोटे,दिपक ठाकरे ,प्रदिप पाटील, चंद्रकांत पाटील , योगेश पाटील, उत्तम दगडे, शरद गोपाळ ,सर्वेश पाटील, प्रविण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, सहकारातून समृद्धी यावी यासाठी एकनाथराव खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीची मुहूर्तमेढ रोवली परंतु ते सतत विरोधी पक्षात असल्या कारणाने व शासनाच्या धोरणांमुळे सूतगिरणी पूर्णत्वास आलेली नव्हती. स्व निखिलभाऊ खडसे यांच्या कार्यकाळात इमारतीचे काम झाले होते परंतु मशिन बाकी होत्या मी सूतगिरणीची चेअरमन झाल्यावर सूतगिरणी पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला व सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले आज आठ वर्षे झाले सूतगिरणी सुरळीत चालू असून या माध्यमातून आपल्या परिसरातील ६०० जणांना रोजगार उपलब्ध झाला. यात ४०० महिला कामगार आहेत. महिला कामगार उत्कृष्टरित्या सूतगिरणीमध्ये काम करत आहेत स्थानिक महिलांना आपल्या घराजवळ रोजगार उपलब्ध करून देता आला यात समाधान आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यात शासनाकडून परवानगी मिळाल्यास सूतगिरणीमध्ये कापड निर्मितीचा मानस आहे यातून आणखी रोजगार उपलब्ध होऊ शकेल. मुक्ताई साखर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नाथाभाऊ यांनी या मतदारसंघात गेले तिस वर्षे विकासाचे राजकारण केले. विकासकामे करताना त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत डांबरी रस्त्यांचे निर्माण केले कासारखेडा -मन्यारखेडा यासारख्या लहान सहान गावाला चहूबाजुनी रस्त्यांनी जोडले प्रत्येक गावात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक सभागृह इत्यादी मुलभूत सुविधांसाठी मोठया प्रमाणात निधी दिला याच विकास कामाच्या बळावर तुम्ही तिस वर्ष एकनाथराव खडसे यांना साथ दिली तिच साथ कायम राहू द्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद व्हा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
याप्रसंगी सारोळा येथील सुनिल काटे, विलास पाटील, विनोद काटे, ईश्वर पाटील, महेंद्र पाटील, मांगो पाटील, रामराव पाटील, नवलसिंग पाटील, भरतसिंग पाटील,प्रकाश साळुंखे, प्रविण शिर्के, विनोद बाजीराव काटे, ज्ञानेश्वर काटे, नाना डहाके ,सोमा इंगळे, निना सुरवाडे, सुरेश इंगळे, मधुकर दामोदरे, सुभाष गोरे, विजय यमनेरे, रतन कोळी, रमेश कोळी, समाधान कोळी, विजय कोळी, अशोक सोनवणे, संजय सोनवणे, साहेबराव सोनवणे, विलास भिल, आनंदा गोपाळ, युवराज गोपाळ, श्याम बेलदार, माळेगाव येथील योगेश पाटील, सर्वेश पाटील, प्रविण पाटील ,उत्तम दगडे, शरद गोपाळ,अशोक ठाकरे सुभाष मोरे, अमोल पाटील, हरिओम पाटील, दिपक पाटील, निलेश पाटील, सुभाष पाटील,हरी पाटील, मुकेश पाटील, भगवान पाटील, मंसाराम भिल, ज्ञानेश्वर पाटील,अविनाश पाटील, विठ्ठल पाटील,भगवान निकम, सिताराम ठेलारी,लाला गोपाळ, विकास मोळी,गोविंदा गोपाळ,रतन भिल, युवराज भिल, सचिन भिल, सिताराम गोपाळ, ज्ञानेश्वर गोपाळ, वढवे येथिल दिनकर पाटील, नारायण पाटील, समाधान पाटील, वेडू पाटील, विलास पाटील, एकनाथ पाटील, शांताराम पाटील, आत्माराम कोळी, पुंडलिक कोळी, संदिप पाटील, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बारसु पाटील, जगदेव पाटील, देवराम कोळी, शामराव पाटील, जितेंद्र पाटील, प्रविण पाटील, निखिल पाटील, कासारखेडा येथील नामदेव पाटील, सुभाष पाटील,जगदेव पाटील, लक्ष्मण पाटील, हरी पाटील, संदिप पाटील, प्रदिप पाटील, विष्णू पाटील, देविदास पाटील, बाबुराव पाटील, ज्ञानदेव पाटील, रमेश पाटील, अजय पाटील, आकाश पाटील, समाधान पाटील,पवन कोळी, चेतन पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.







