सर्वसामान्यांसाठीही उघडणार लोकलचे दार?

local-train

महाआघाडी सरकारकडून संसर्गासंबंधीच्या नियमांचे पालन
करत लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रस्ताव

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाच पाऊलं उचललं आहे. सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव रेल्वेला देण्यात आला आहे. तसं, पत्रक आज सरकारकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप रेल्वे प्रशासनाकडून या पत्रावर उत्तर देण्यात आलं नाही.

 

मिशिग बिगीन अंतर्गंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर सर्व महिला, वकिल यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधी देणार असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर राज्य सरकारला तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने रेल्वेला पाठवलेल्या पत्रकात ठराविक वेळेनुसार लोकल प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तसंच, गर्दीच्या वेळी अधिक लोकल सोडण्यात याव्या, असंही पत्रात नमूद केलं आहे.

 

पत्रामध्ये राज्य सरकारनं करोनासंबंधित नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच, लोकल सेवा कश्या पद्धतीने सुरु करायची याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे. अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी ७. ३०ची पहिली लोकल तसंच, ११ ते ४. ३० आणि ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.

 

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशी व ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसंच, ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८.३० ते १०.३० तसंच, संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here