भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन

nandurbar-abhiwadan

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पंचशिल त्रिशरण बुधदवंदना सामुहिक पठन करण्यात आले.

 

उभे आयुष्य दिनदलितांसाठी उपेक्षित वंचित वर्गासाठी घालविले६ डिसेंबर १९५६ ची पहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी, या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला, वाऱ्यासारखी बातमी साऱ्या देशभर पसरली, दिनदलीतांचा वाली आता राहिला नाही, त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही, जे सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अश्या स्थितीतही लोक मुंबईला येत होते, प्रत्येक जण रडत होता, कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते, अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता, चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबांचा देह ठेवला गेला, बाबांच्या चितेतील एक एक ठिणगीही जणू प्रत्येकाला संदेश देत होती, की “बाळांनो रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र आणू नका,शिका, संघटित व्हा, अन संघर्ष करा”.

 

यावेळी कार्यक्रमास उपस्थित अरविंदजी कुवर, मिलिंद कुलकर्णी तहसीलदार , एम.रमेश प्रभारी अॅडीशनल एस.पी., विष्णू जोंधळे,चंद्रकांत पाटील सुरेन्द्र कुवर, दिलीप जगदेव, संतोष कुवर, सुनिल शिरसाठ, सुनिल गायकवाड, नाना निकम,किरण मोहिते,शुभम कुवर, भिमराव बिरारे,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here