मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्यातील महाविद्यालय लवकरच सुरू होणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.







