अहमदाबाद – दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा चांगलाच बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची एकही धाव झालेली नसताना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
इंग्लंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या रुपात धक्का बसला. राहुल जेव्हा बाद झाला तेव्हा भारताची एकही धाव झाली नव्हती. ुण त्यानंर किशन आणि कोहली यांनी भारताचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी विजयाचा पायाही रचला. कोहलीपेक्षा यावेळी पहिलाच सामना खेळणार इशान हा अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत होता. इशानला यावेळी ४० धावांवर असताना जीवदानही मिळाले. बेन स्टोक्सने यावेळी इशानला जीवदान दिले. पण त्यानंतरही इशानने तुफानी फटकेबाजी सुरुच ठेवली आणि षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर इशान जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. इशानने आपल्या पहिल्याच सामन्यात ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची जबरदस्त खेळी साकारली.
पंत बाद झाल्यावर कोहली आणि रिषभ पंत यांनी फटकेबाज सुरुच ठेवली. पंतने यावेळी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. यावेळी कोहलीनेही पंतला चांगली साथ दिली. पण कोहलीपेक्षा पंत अधिक जास्त फटकेबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात पंत यावेळी बाद झाला. पण पंतने यावेळी १३ चेंडूंत २६ धावांची जबरदस्त खेळी साकारली. पंत बाद झाल्यावर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. श्रेयस आणि कोहली यांची चांगली जोडी जमली. कोहलीने यावेळी अर्धशतकही पूर्ण केले.
Told you all the @mipaltan were better than India … What a debut @ishankishan51 !! #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
कालच्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल केले व इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या धडाकेबाज फलंदाजांना पदार्पणाची संधी दिली. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरीच्या जोरावर दोघांनीही टीम इंडियात स्थान मिळवले. सामन्यात सुर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण इशान किशनने मात्र आक्रमक अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यावरुनच वॉनने भारतीय संघाला आणि टीम इंडियाला पुन्हा टोला हाणला आहे. ‘बीसीसीआयने माझा सल्ला ऐकला आणि मुंबई इंडियन्सच्या जास्त खेळाडूंना संघात संधी दिली…मी आधीच म्हणालो होतो मुंबई इंडियन्स टीम इंडियापेक्षा चांगला संघ आहे’, अशा आशयाचं ट्विट वॉनने केलं आहे. यासोबतच त्याने पदार्पणामध्येच शानदार कामगिरी करणाऱ्या इशान किशनचही कौतुक केलं. शिवाय, मायकल वॉनने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या गचाळ क्षेत्ररक्षणावरुनही निशाणा साधला आहे.
I am inviting all the Indian Team to join my Fielding academy … it’s a very exclusive club … #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
‘सर्व भारतीय संघाला मी माझ्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षण संस्थेत येण्याचं निमंत्रण देतो’, अशा आशयाचं ट्विट करत त्याने भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणावर बोट ठेवलंय. दरम्यान, दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीची संधी न मिळाल्याने सुर्यकुमार यादवला आपली छाप पाडता आली नाही, पण आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. संघातील आपली निवड सार्थ ठरवत त्याने 28 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. चौकार आणि षटकारांची बरसात करत त्याने 32 चेंडूंमध्ये 56 धावांची दमदार खेळी केली, आणि सुरूवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाची हवा काढली व भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.






