मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन परिस्थिती आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लसीकरण वाढवावे लागणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.
हा पुरवठा न झाल्यास लसीकरण येत्या ४ दिवसात बंद पडेल, असे असे त्यांनी सांगितले आहे. मात्र गुजरात राज्यात महाराष्ट्राच्या मानाने कमी लोकसंख्य असूनदेखील तेथे महाराष्ट्रापेक्षा जास्त लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. हि महाराष्ट्र राज्याला मिळणारी सावत्र वागणूक आहे, अशी भावना सर्वत्र पसरत आहे.







