काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

हिंगोली (प्रतिनिधी) – काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज हिंगोलीत अंत्यसंस्कार झाले. हिंगोलीतील कळमनुरीच्या मसोड या मूळगावी सातव अनंतात विलिन झाले. मुलगा पुष्कराज यांने सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मात्र यावेळी सातव यांच्या मुलीनं असं काही म्हटलं की, त्याठिकाणी असलेल्या सर्वांचंच हद्य पिळवटून निघालं.

राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी सातव यांच निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव हिंगोलीला आणण्यात आलं. सोमवारी कळमनुरीच्या मसोड या त्यांच्या मूळ गावी सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातव यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे काही नेते उपस्थित होते. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज यानं सातव यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रु तराळले होते.

राजीव सातव यांना गांधी कुटुंबीयांच्या जवळील मानलं जातं होतं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे विश्वासू म्हणून राजीव सातव यांना ओळखलं जायचं. राजीव सातव राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य मानले जात. मोदींच्या लाटेतसुद्धा शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here