स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश; उद्याचे स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित
नाशिक (विशेष प्रतिनिधी) – केंद्राने खत दरवाढ मागे घेतली.उद्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खत दर वाढण्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
खतांच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ वाढीच्या विरोधात बळीराजाने पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यात लाखो शेतकरी पत्र पाठवून आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले होते. यावर केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली असुन राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे.
सरकार किसानों के जीवन को बेहतर बनाने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए अंतरराष्ट्रीय मूल्यों में बढ़ोतरी के बावजूद हमने उन्हें पुरानी दरों पर ही खाद मुहैया कराने का निर्णय लिया है। आज के फैसले के बाद DAP खाद का एक बैग 2400 रु की जगह 1200 रु में ही मिलेगा।https://t.co/cjJcqUsgEG
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2021
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित केले गेले असल्याचे नाशिक येथील समन्वयक कुबेर जाधव यांनी बुलंद पोलीस टाइम्सशी बोलतांना सांगितले.






