कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) – रायगड जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासन अलर्ट झालं असून कर्जत तालुक्यातील कर्जत नगरपालिका हद्दीतील मुद्रे येथील आठ कुटुंबातील 48 नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले असून यावेळी प्रांताधिकारी वैशाली परदेशी ,नायब तहसीलदार सुधाकर राठोड,मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,पोलीस निरीक्षक भोर,माजी नगरसेवक संतोष पाटील ,सुदाम म्हसे, रविंद्र लाड आदी यावेळी उपस्थित होते.






