नवी मुंबई विमानतळ नामांतर : मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम; कृती समितीची बैठक निष्फळ

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातुन येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी दि.२० रोजी कृती समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्याने नामकरणाचा वाद चिघळणार आहे.

यापुर्वी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती.यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी विमानतळा ऐवजी इतर प्रकल्पला दिबांचे नाव सुचविण्याची सुचना केली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये फूट पडल्याचे दिसुन आली. महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांनी विमानतळाऐवजी इतर प्रकल्पाला दिबांचे नाव देण्याबाबत तयारी दर्शविली होती. तर भाजपसह इतर प्रकल्पग्रस्त नेते दिबांच्या नावावर ठाम होते.याबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी देऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.

ही बैठक रविवार दि,२० रोजी वर्षा निवासस्थानी पार पडली.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत ठाम भुमिका घेतली. इतर प्रकल्पाला दिबांचे नाव सुचविण्याचे पुनरूच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करीत नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळा ऐवजी दुसरे कोणतेच पर्याय मान्य नसल्याची भूमिका घेतली. या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, संतोष केणे,राजेश गायकर आदींसह प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here