अनंतनागमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : अनंतनाग जिल्ह्यातील कवारीगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. परिसराची नाकाबंदी करून सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे.

पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कवारीगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने गावात शोधमोहिम सुरू केली. त्यावेळी जवानांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here