ठाण्यात सलग पाचव्या दिवशीही अभूतपूर्व वाहतूक कोंडी; ठाणे – नाशिक हायवेवरील वाहनधारक त्रस्त

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : ठाणे- नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावर सलग पाचव्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळतं आहे. या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून,. माजिवडा सर्कल कळवा उड्डाणपूल मुंब्रा टोल नाका भिवंडी मानकोली भिवंडी बायपास या सर्वच मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे या महामार्गावर जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगाच लागलेल्या आहेत.

विशेष करून अवजड वाहनांची संख्या या वाहतूक कोंडीमध्ये मोठी आहे. धक्कादायक म्हणजे ठाण्यात असलेल्या कोविड सेंटरवर रुग्णांना नेण्यास या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड वेळ लागतोय. तर दुसरीकडे या महामार्गावर असलेले अनेक मोठे हॉस्पिटल विशेष करून ज्युपिटर हॉस्पिटल येथे जाण्यास लोकांना किमान दोन-तीन तास प्रवास करावा लागत आहे.

ही वाहतूक कोंडी माजिवडा सर्कल आणि माजिवडा उड्डाणपूल पासून ते आता घोडबंदर ज्युपिटर हॉस्पिटल आणि बाळकुम या सर्व भागात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली. दोन दिवसांपूर्वीच या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी याकरता ठाणे वाहतूक पोलिसांनी स्वतःहून या महामार्गावरील अनेक खड्डे बुजवले होते. पण पुन्हा पाऊस पडला आणि या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना पाच ते सहा किलोमीटरच्या रस्त्याकरिता चार ते पाच तास वेळ लागतोय.

ठाणे नाशिक या महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आता ठाण्यात देखील वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे. कारण ज्यांना भिवंडी किंवा नाशिक येथे जायचं असेल तर त्यांना हा एकच मार्ग आहे आणि त्यामुळे येथूनच प्रवास करावा लागतोय. खड्डे बुजवण्या करिता अनेक राजकीय पक्षांनी गांधीगिरी नाही तसंच तोडफोड करून आंदोलने देखील केली. एवढेच काय तर भिवंडीतील तरुणांनी इथं पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये रबरी बोट चालून एका अनोख्या पद्धतीने खड्ड्यांविरोधात आपला निषेध नोंदवला होता. पण तरी देखील इथले खड्डे जैसे थेच आहेत. मग नेमकं आता हे खड्डे बुजवणार कोण हा देखील मोठा प्रश्न आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ठाण्याचे रहिवासी देखील आहेत. तरी देखील या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही पाहायला मिळतेच आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले होते, पण त्याचा देखील काही परिणाम होताना दिसत नाही आहे. कारण शेवटी या महामार्गावरील खड्डे वाहतूक पोलिसांनाच बुजवावे लागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here