सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : यावल तालुक्यातील किनगाव येथून बऱ्हाणपूर कडे जाणारा बु-हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेर-सावदा या रस्त्यावर विवरे गावाजवळ एका मालवाहू वाहनाचा तोल गेल्याने १६ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.६) रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली.
यावल तालुक्यातील किनगाव येथून बऱ्हाणपूरकडे कांद्याने भरलेले हे वाहन जात असताना विवरे गावाजवळ उलटले. त्यात १६ जण जखमी झाले. त्या जखमीं पैकी शेख अमजद शेख सलीम, शेख कलीम शेख जैनौद्दीन हे गंभीर जखमी झाले आहे.
याबाबतची माहिती मिळताच रात्री कोमी एकता ग्रुपचे जबाबदार सय्यद असगर सावदा कुरबान मेंबर फैजपूर त्यांच्याकडून मदत मिळाली.प्रत्येकाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर जखमींमध्ये शेख इमरान, आसीफ खान, शेख परवेज, शेख इस्माईल, शेख अजहर, शेख अनिस, शेख ऐजाज सर्व रा. कर्जीद ता. रावेर. आदींचा समावेश आहे. बया प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.







