घरात भाडोत्री ठेवत असाल तर त्याची माहिती पोलीस ठाण्यात द्या – प्रा. डॉ.जयपाल पाटील

पोलीस

पनवेल (उपसंपादक गणेश पाटील) : आपली अनेक घरे असतील तर रिकामी ठेवण्याऐवजी ती भाड्याने देतो. त्या भाडोत्र्याने म्हणजे परदेशी नागरिकाने जर देश विरोधी कार्य केले अथवा करीत असेल तर त्याच्यावर व घर मालकावर कायदेशीर कारवाई होऊन शिक्षा व दंड होऊ शकतो, यासाठी आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात देऊन, वाढदिवसाच्या आधार कार्ड, रंगीत छायाचित्र, देऊन सुरक्षित रहा असे मार्गदर्शन ग्रामपंचायत गुंजीस ने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत रायगड भूषण प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. सदिच्छा पाटील, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्राध्या. डॉ.जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी श्रीमती पूजा पाटील, श्रीमती रेखा म्हात्रे, श्रीमती तनिषा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापिका श्रद्धा पाटील, पीएनपीच्या अस्मिता म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे सरपंच व ग्रामसेविका यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी सरपंच श्रीमती सदिच्छा पाटील यांनी आपले घर संसार सांभाळताना महिलांना वेगवेगळ्या आपत्या समोर जावे लागते. त्यामुळे आर्थिक मानसिक नुकसान होते, यासाठी कोणकोणत्या सुरक्षा काळजा घ्याव्यात म्हणून ग्रामपंचायतीने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन केले आहे त्याचा लाभ आपण घेऊन ज्यांना आजच्या कार्यशाळेत यायला जमले नाही त्यांना सांगावे असे प्रास्ताविकात सांगितले.
यानंतर डॉ. जयपाल पाटील यांनी सर्वांसोबत संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या 112 क्रमांक संपर्क साधला. महिलांच्या बाळंतपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे 102 रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेत संपर्क साधला. आणि म्हात्रे पोलीस हवालदार म्हणाले सध्याच्या काळात घरातील सर्वजण नोकरदार असल्याने एक घर गावाकडे दुसरे नोकरीच्या ठिकाणी तर मुला मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात घर घेतले जाते, काही वेळा तेथे कोणीही राहत नसल्याने घराची दुर्दशा होते यासाठी एजंटामार्फत आपण घर भाड्याने देतो, आपल्या सुरक्षेसाठी भाडे कराराची एक प्रत, त्याचे आधार कार्ड, एक रंगीत फोटो नजीकच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षका कडे अर्ज करून त्याची पोच घ्यावी, यामुळे भाडोत्री काही चुकीचं वागला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी पोलीस ठाण्यातून आपण केलेल्या अर्जाची पोहोच मुळे आपणावर गुन्हा दाखल होणार नाही यामुळे तुम्ही सुरक्षित रहाल असे सांगितले.
यावेळी कृषी खात्याचे कृषी सहायक श्रीयुत संतोष टकले यांनी खोडकिडा नारळ सुपारी बघायची वर येणारे किडे यामुळे येणारे आपत्ती बाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री राजेश मांडवकर श्री प्रवीण लाखन श्री किरण म्हात्रे श्री संतोष पाटील श्री सचिन पाटील कृणाल चव्हाण निखिल नवाळे, मनीषा पाटील आशा रजनी म्हात्रे आशा कृतिका पाटील आशा, गीतांजली पडते आशा, नेहा पडते अंगणवाडी सहाय्यक यांनी मेहनत घेऊन शेवटी आभार ग्रामसेविका पूजा पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here