शिवाजीनगरवासियांकरिता जळगाव रेल्वे स्थानकावरील पूल सुरु करावा

  • शिवाजीनगर शिवसेनेचे स्टेशनमास्तरांना निवेदन
  • मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी इमरान शाह) – शिवाजी नगर मधील रहिवाशांना होणारा त्रास हा प्रचंड स्वरूपाचा असून ज्या दिवसापासून उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे त्या दिवसापासून शिवाजीनगर मधील नागरिकांना शहरात येण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडतोय त्यामुळे शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांना तहसील ऑफिस कडील भागातून अवैधरित्या रेल्वे रूळ ओलांडून प्रसंगी जीव धोक्यात टाकून शहरात यावे लागते.
रेल्वे प्रशासनातर्फे स्थानिक नागरिकांसाठी रेल्वेचा जिना वापरण्याची परवानगी दिलेली होती मध्यंतरात लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनातर्फे सदर ब्रिज बंद करण्यात आला होता परंतु पूर्ण देश अनलॉक झाल्यानंतरही तो ब्रिज सुरू करण्यात आलेला नाही तरी आपण पुनश्च एकदा परवानगी द्यावी. रेल्वे स्टेशन मास्तर श्री अग्रवाल व आरपीएफ इन्स्पेक्टर श्री पटेल यांना या निवेदनाद्वारे विनंतीवजा इशारा देण्यात येत आहे की सात दिवसाच्या आत रेल्वे जिना वापरण्याकरता सुरू करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यात येईल असे माजी शिवाजीनगर शिवसेना विभागप्रमुख विजय राठोड यांच्यातर्फे कळविण्यात आले
निवेदन देताना शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख ज्योतीताई शिवदे विशाल वाघ समीर खाटीक प्रवीण पगारे इमरान शहा योगिता शुक्ल छाया कोरडे गणेश महाजन रमाकांत नायडू पंकज राजपूत जुबेदा बी शेख हर्षल जोशी राहुल विखे व शिवाजीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here