नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – मुलीला देवी मानली जात असलेल्या भारत देशात काही हैवान मुलींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केली जात आहे. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सर्वत्र होत आहे.
मुली – महिलांविषयी वाईट दृष्टीकोन ठेवणाऱ्या अपप्रवृत्तींच्या निषेधार्थ नवी मुंबई युवक काँग्रेस तर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ‘हम शर्मींदा है’ या शीर्षकाखाली आंदोलन करुन उत्तर प्रदेश राज्यातील दोन पीडित मृत तरुणींना आदरांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमाला निझाम अली शेख, नीला लिमये प्रवक्ता- महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस, सिंदीया घोडके सरचिटणीस- नवी मुंबई जिल्हा कांग्रेस, महेश भनगे, सुरज देसाई, तुकाराम कदम, सोमनाथ बारवे, पुजा धोत्रे माजी अध्यक्ष – नवी मुंबई महिला कांग्रेस ,शशिकला सिंग उपाध्यक्ष -पनवेल कांग्रेस, आफ्रिदी शेख, अनिस रेहमानी, रोशन थॉमस, आरती कुमावत, मोहिनी, तस्लिमा सय्यद, स्टीफन घोडके, सुरेंद्र धोडके, अबीड मंसुरी, नवाज़ सय्यद, इरफ़ान ख़ान,सोहैल शेख, हाशिम शेख व अन्य नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.








