ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये २००७ ते २०१७ पर्यंत शिवसेनेचे दहा वर्षे नगरसेवक राहिलेले माजी. नगरसेवक व 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट नाकारल्यामुळे कट्टर शिवसैनिक प्रधान धर्माजी पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर आखिरकार आज महाराष्ट्राचे ( राज्यमंत्री ) लोकप्रिय नेता व कणखर नेतृत्व करणारे आमदार बच्चु भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड.स्वप्निल पाटील, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री हितेश जाधव जी पक्षाचे प्रवक्ते ॲड.मनोज टेकाडे, ॲड.अजय तापकीर वअसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उल्हासनगर शहराध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.








