जळगांव (संपादक सुनिल पाटील) – सेवक सेवाभावी संस्था कडून कोरोना महामारी च्या काळात धर्मरथ फाउंडेशने जे समाज उपयोगी काम केलं अश्या संस्थेतील सर्वांचा सत्कार करून विनायक पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला गेला.
धर्मरथ फाउंडेशने सामाजिक दायित्व समजुन समाजोपयोगी कार्य नेहमी केले.त्या मध्ये कोरोना काळात धर्मरथ फाउंडेशन मध्ये ज्यांनी ज्यांनी महामारी कोरोनाच्या काळात काम केले व नेहमी सामाजिक कार्यात झटत असतात असे सर्व श्री.संतोष दादा भिंताडे,श्री.हिरामण भाऊ तरटे,श्री.प्रकाश भाऊ मुळीक,श्री.निशांत भाऊ पाटील,श्री.सागर भाऊ बडगुजर,श्री.धर्मद्र भाऊ चौधरी,श्री.तुषार भाऊ सूर्यवंशी, श्री.भगवान भाऊ सोनवणे, श्री.ईश्वर भाऊ शिंदे,श्री.दीपक भाऊ पवार,श्री.मिलिंद भाऊ बडगुजर, श्री.दिनेश भाऊ पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा पुरस्कार धर्मरथ फाउंडेशन ला मिळाला आहे.त्या सर्वांचे अभिनंदन तसेच बरेच लोक होते की त्यांनी सांगितले की आम्ही धर्मरथ फाउंडेशनला मदत करतो पण आमचा कुठेही नाव घेऊ नका त्यांचं ही सहकार्य नेहमी धर्मरथ फाउंडेशनला लाभले आहे.







