नैसर्गिक आपत्ती कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य करावे – रणजीतसिंह बक्षी

दिल्ली (प्रतिनिधी) – सद्यस्थितीत भारतात मोठ्या संख्येने पसरलेल्या कोविड १९ कोरोना व्हायरस या महामारीमुळे ज्या लोकांनी आपले कुटुंबिय गमावले आहे. त्या सर्वांच्या दुःखात सहभागी होत, कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असल्याने, ही संपुर्णतः भारत सरकारची जबाबदारी असून, या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य सरकारचे आहे पण या आपत्तीत काही नागरिकांचे जे नुकसान झाले आहे, त्या नुकसानाकरिता सात्वंन म्हणून भारताचे पालक महामहीम राष्ट्रपती यांनी त्या नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करावी, अशी मागणी दैनिक कर्मक्रांतीचे प्रकाशक व संपादक रणजीतसिंह बक्षी यांनी महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी बस्तर छत्तीसगढ येथील जिल्ह्याधिकाऱ्यांना सुपुर्द केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here