मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

कोरोना रुग्णसंख्येने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड

मुंबई – देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस ही संख्या आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारला लॉकडाऊन हा एकमेव मार्ग राहतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

काल राज्यातील रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड तोडून आकडा 27 हजारांच्या पार केला होता. त्यातच मुंबईतील रुग्णसंख्येनेही आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पालिकेच्या कोविड अपडेटनुसार गेल्या 24 तासात मुंबईत 3775 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. अद्याप राज्याची कोरोना अपडेट आलेली नाही. मात्र पालिकेने दिलेल्या अपडेटनुसार ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. काल राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा पार केला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. राज्यातील पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती तर खूपच गंभीर आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा महाराष्ट्रात कोरोनाचे तितकेच रुग्ण येत आहे. कोरोनाची दुसरी वाट येत्या काळात काय काय करू शकते, याबाबत महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 90 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची ही प्रकरणं फार गंभीर नाहीत पण कोरोनाव्हायरस आता युरोपप्रमामे वेगाने पसरतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here