मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – भांडुप येथील ड्रीम्स मॉल आणि पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला लागलेल्या आगीच्या घटना ताज्या असतानाच मुंबईत शनिवारी पहाटे आणखी एक आगीची घटना घडली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची समयसूचकता व संवेदनशीलतेमुळं मोठा अनर्थ टळला.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात उपोषण केल्यानंतर नाना पटोले हे भिवंडी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेले होते. भिवंडी येथील कार्यक्रम आटोपून शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ते मुंबईत परतले.
काल रात्री भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून रात्री १:४० वाजता परत येत असतांना परेल येथील एका इमारतीला आग लागलेली बघुन तत्काळ ताफा थांबविला.
आणि लगेच पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड ला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात येईपर्यंत थांबुन राहीलो यामुळे मोठा अनर्थ व जिवितहानी टळली. pic.twitter.com/erKTkcPi0G— Nana Patole (@NANA_PATOLE) March 27, 2021
परळ येथून जात असताना लंडन वाईन शॉपच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून आगीच्या ठिकाणाकडे धाव घेतली. त्यांनी स्वतः पोलीस आणि फायर ब्रिगेड, पोलीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करून आगीच्या घटनेची माहिती दिली. तसेच आग लागलेल्या व आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना जागे करून बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ही संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत पटोले स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.






