गृहमंत्री अमित शहा बेपत्ता; दिल्ली पोलिसात एनएसयुआयचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी दाखल केली तक्रार

amit-shah

नवी दिल्ली – ‘नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणं आणि सेवा करणं हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

गृहमंत्री शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केलाय. २०१३ पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते परंत, भाजप सत्ते आल्यानंतर मात्र हे चित्रं पालटलं. महामारी सारख्या कठीण काळात पंतप्रधान पदानंतर दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती मात्र गायब झाली आहे, असंही चूग यांनी म्हटलंय.

देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणं आणि जबाबदारी घेणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु, सद्य सरकार मात्र यात अपयशी ठरत असल्याचं दिसतंय. त्यामुळे ‘एएसयूआय’नं गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असंही एनएसयूआयनं आपल्या निवेदनात म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here