पावसामुळे पाचोरा येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

जळगाव (महाराष्ट्र सहसंपादक तिलोत्तमदास बोंडे) : जिल्ह्यातील पाचोरा येथे काल, सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांपूर्वी ही इमारती बांधली होती. मात्र बांधकामात तांत्रिक दोष राहिल्यामुळे पाचोऱ्यातील ही इमारती कोसळली.

यापूर्वी या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे इमारतीमधील अनेक भाडेकरुंनी घर सोडली होती, म्हणून या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवतहानी झाली नाही. पाचोरा शहरातील बाहेरपूरा भागात ही इमारत होती. मुंबईचा रहिवासी असलेला साजेदावी शेख खल्ली या व्यक्तीने गुंतवणूक म्हणून ही इमारत पाच वर्षांपूर्वी बांधली होती.

मुसळधार पावसामुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच अनेक भाडेकरू इमारतीमधील घरं सोडून गेले होते. काल, सोमवारी रात्री तुरळक प्रमाणात पाऊस पडला आणि त्यानंतर पत्त्याच्या इमारतीप्रमाणे ही इमारत कोसळली. सुदैवाने दुर्घटनेपूर्वीच लोकं घर सोडून गेल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here