महाराष्ट्रातील तब्बल २०२१ कवींनी रचलेल्या २०२१ कवितांचा समावेश
अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील “महामानव” या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन आज अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव यांच्या दालनात संपन्न झाले. यानिमित्ताने अपर जिल्हाधिकारी श्री.अमोल यादव यांनी या महाकाव्य ग्रंथासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, प्रा.प्रज्ञा शेटे, कवी मारुती सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, जेष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, महेंद्रकुमार गायकवाड, कवी मधुकर जाधव, उद्योजक कुणाल भोईर, सुजित नांदगावकर हे उपस्थित होते.
सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे यांचे बंधू नांदेडचे रहिवासी प्रा.अशोककुमार दवणे यांनी हे महाकाव्य रचण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या महाकाव्य ग्रंथात २०२१ या वर्षाचे निमित्त साधून एकूण २०२१ महाराष्ट्र मधील कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या २०२१ कवितांचा समावेश आहे. या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.