जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडचणी समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्रधान्य घावे, असे प्रतीपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांने केली. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मार्य. मुंबई यांच्याकडुन बांधण्यात आलेल्या जळगाव येथील २५२ पोलिस कर्मचारी निवासस्थान इमारती तसेच राखीव पोलिस निरिक्षक कार्यालय इमारतीचे उद्घाटन समारंभाप्रसंगी गृहमंत्री बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, महापौर श्रीमती जयश्री ताई महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटिल, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ बी जी शेखर- पाटिल, जिलाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलिस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्हांचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले की आज २५२ सदनिकांचे वितरण करतांना मला खुप आनंद होत आहे. या सदनिका सुसज्ज असुन बांधकामाचा दर्जा देखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि सहाजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होणार आहे. टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी निधींची कमतरता भासु देणार नाही. जिल्हातील पोलिस स्टेशनच्या विकासाला प्रधान्य देताना प्रधान्यक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्या बाबतही विचार करण्या येईल. कायदा व सुव्यस्था राखणे ही सर्वाची एकत्रित जबाबदारी असल्याने सांगुन पोलिस स्टेशनमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तिच्या तक्रारीची दखल घेउन त्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही गृहमंत्री म्हणाले. यावेळी गृहमंत्री यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरुपात पाच पोलिस कर्मचाऱ्यांना घराची किल्ली प्रदान करण्यात आली.
यावेळी त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले पालक मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की कोरोना काळात जळगाव जिल्हा पोलिस दलाने चांगली भुमिका बजावली आहे. या पुढेही जिल्हातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी जळगाव आणि भुसावळ शहरात सीसीटीव्ही केमरे बसविणे आवश्यकता आहे. पोलिस दलाला ३६ चारचाकी तसेच ३० दो चाकी वाहने जिल्हा वार्षिक योजनेतुन दिली आहेत आणखी वाहनांची आवश्यकता असल्याने वाहन खरेदीसाठी २ कोटी निधींची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमात राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फण्सकर हे ऑनलाइन सहभागी झाले होते. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते