छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यानंतर जालन्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १६ बसेस जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी हे आदेश दिले आहेत.
सोमवार दिनांक ४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.