पुणे (बाजीराव नाईक) – मंगळवार (दि.१८) बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रमुखपदी सौ मिनाताई सुभाष राहिंज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सौ मिनाताई यांची स्त्री न्याय हक्कासाठी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या प्रमुख पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सौ मिनाताई प्रेस रिपोर्ट असून .महिलांवर अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या रणरागिणी आहेत.सौ मिनाताईनां अनेक संस्थांनी कोविड योद्धा म्हणून. पुरस्कार देऊन सन्मानित केल आहे विविध पक्ष संघटना यामध्ये सौ मिनाताई यांनी चांगल्या पद्धतीने काम केल आहे. महिला बचत गट महिला स्वयंरोजगार व महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या सौ मिनाताई यांना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे . आपल्या देशात कोरोणाचे संकट उभे असताना सौ मिनाताई यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा मनापासून करत होत्या.अन्न धान्य वाटप करण्यात करत होत्या. त्यांची समाजाप्रती असणारी आस्था पाहून बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि) संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांनी बिनविरोध निवड केली असून, संपूर्ण महाराष्ट्रात सर्व धर्म समभाव हिच मनात ठेवून समाज सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणत सौ मिनाताई ताई यांना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रमुख या पदी कार्य करण्यासाठी राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ मनिषा बाजीराव नाईक, मध्य प्रदेश महिला अध्यक्ष सौ ज्योती राजेंद्र सिरावले, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र वसंत सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष...







