नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे ‘सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ या विषयावर गृह मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्रावर भर दिला.
सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी, सायबर हेल्पलाइन ‘१९३०’ चे महत्त्व वाढवणे आणि लोकांना त्याच्या वापराबद्दल जागरूक करणे महत्वाचे आहे. त्यांनी सुचवले की सायबर स्पेसमधील सॉफ्टवेअर, सेवा आणि वापरकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच सायबर फसवणूक पूर्णपणे रोखता येईल. तसेच सायबर सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण केवळ सरकारद्वारेच नाही तर सर्व सायबरस्पेसशी संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांद्वारे देखील शक्य आहे.
सायबर फसवणूक आणि गुन्ह्यांविरुद्धची ही संयुक्त लढाई असेल ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासाव्यतिरिक्त समाजात जागरूकता देखील आवश्यक आहे.







