सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) । भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला लग्नानंतर त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना घरीच अक्षर ओळख करून दिली आणि शिक्षित केले.
सावित्रीबाईंनी अशा काळात शिक्षणाचे कार्य हाती घेतले जेव्हा स्त्रियांना शिकवणे निशब्द मानले जात असे. पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात ज्योतिबाच्या सोबतीने त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांचा संघर्ष शाळेत शिकवायला जाताना सनातनी लोक त्यांच्यावर सेन दगड आणि चिखल फेकत असत पण सावित्री फुलेंनी न डगमुकता आपले कार्य सुरूच ठेवले त्या स्वतःसोबत पदरात दुसरी साडी घेऊन जात असत.
सावित्रीबाई चे कार्य केवळ शिक्षणापूर्ती मर्यादित नव्हती तर त्या अनेक अनिष्ट प्रथाविरुद्ध लढा दिला. बाल हत्या प्रतिबंध विधवा महिलांच्या मुलींसाठी त्यांना आश्रयस्थान सुरू केले ज्योतिरावरच्या निधनानंतर त्याने सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले आणि हुंडा विवरित हित लग्नांना चालना दिली अस्पृश्यासाठी त्यांनी आपल्या घराचा पाण्याचा हौद खुला केला जे त्या काळी अत्यंत धाडसी पाहून होते. सावित्रीबाई एक उत्तम कवयित्री देखील होत्या त्यांच्या लेखनातून समाजप्रबोधन स्पष्ट जाणवते.
आज शरद नगर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली त्यावेळी उपस्थित शरद नगरचे सरपंच मॅडम धोंडाबाई रायबान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दशरथ शिवाजी कोकरे सर व श्री पांडुरंग शामराव मासाळ उपशिक्षक व ग्राहक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सौ अलका राहुल मस्के अमृता गोडसे व कृतिका गोडसे व कोकण गोडसे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्कृती कार्यक्रम घेतले संगीत खुर्ची घेतली व खाऊ वाटप व बक्षीस वितरण केले.







