पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – २०२० हे वर्ष एक महाभयानक त्रास घेऊन आले.आणि तो त्रास म्हणजे “कोरोना” आपल्या पासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या चीन मध्ये त्याचा जन्म झाला २०१९ च्या सरत्या महिन्याला,आणि आपल्या देशात त्याचे स्वागत झाले २०२० च्या सुरवातीला.कुणाच्या ध्यानी मनी हि नव्हते कि असा एक रोग येणार आहे आणि आपल्या सर्वांच्या जगण्याची आणि वागण्याची दिशा आणि दशा बदलून टाकणार आहे,पण हे सत्यात उतरले आहे.गेले ६ महिने आपण सगळेच मग तो राजा असो किंवा रंक आपण सगळेच या महामारीच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहोत,नव्हे तर क्षणा क्षणा ला मरत आहोत.आणि हे दुर्दैव कधी संपणार हे कुणी सांगू हि शकत नाही.
या महामारीमुळे आपण सगळेच कमी जास्त प्रमाणात त्रास भोगत आहेत.पण सर्वात जास्त त्रास हा झाला आहे तो नोकर वर्गाला.आपल्या लोकसंख्येचा मुख्य वर्ग हा नोकरवर्ग आहे.आणि कोरोना महामारी मुळे बहुसंख्य सामान्य लोकांची नोकरी गेली आहे.आणि ज्यांच्या नोकऱ्या साबूत आहेत ते त्यांना दिल्या जाणाऱ्या पूर्वीच्या पगाराचा अर्धा पगार दिला जात आहेत आणि तो पण तुटक तुटक.पुणे येथील आय टी पार्क पण यातून सुटलेला नाही.पुण्यातील 3 लाख आयटी क्षेत्रातील बहुतांश कर्मचारी कार्यालयांतून काम करत आहेत, तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे.
“आयटी कर्मचार्यांच्या ऑल इंडिया फोरमचे अध्यक्ष इलावरासन राजा यांनी एका वृत्त पात्राला माहिती देताना सांगितले की, भारतात सुमारे 45 लाख आणि पुण्यात सुमारे 3 लाख आयटी कर्मचारी आहेत. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना होम पॉलिसीवरून काम मिळण्याची खात्री नसते”.बँकिंग ग्राहकांच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांसह अनेक बाबींचा समावेश असल्याचे राजा म्हणाले की कंपन्या घरून काम कसे राबवणार हा एक मोठा प्रश्न आहे. ते म्हणाले, “नासकॉमला हे स्पष्ट करावे लागेल की ते ही परिस्थिती कशी हाताळत आहेत.
राज्य सरकारने मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपुरात कोरोनव्हायरस साथीचा रोग जाहीर केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
“आमच्याकडे काही मर्यादेसह गृह पर्यायातून कार्य आहे. पण व्यवस्थापनाकडून कोणताही अधिकृत शब्द मिळालेला नाही. काही कंपन्यांनी कर्मचार्यांना घरगुती पर्यायांमधून पर्यायी काम करण्यास सांगितले आहे. आयटी कर्मचार्यांपैकी एकाने सांगितले की, लोक अजूनही प्रवास करून कार्यालयात येतील, याचा अर्थ नाही. तिने पुढे सांगितले की बरेच कर्मचारी घाबरले आहेत आणि त्यांना कार्यालयात यायचे नाही.
दरम्यान, कोविड –१९ च्या प्रसारानंतर शहरातील शॉपिंग मॉल बंद राहतील, असे पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. तथापि, मॉल्समधील औषध, भाजीपाला आणि किराणा विभाग खुले राहील. ते पुढे म्हणाले की, जर घरातील अलगावतील कोणत्याही संशयित रूग्णांनी नियमांचे उल्लंघन केले तर तिला किंवा त्याला आरोग्य संस्थांमध्ये सक्तीने वेगळे केले जाईल.
या अशा परिस्थितीचा काही कंपन्यांनी फायदा हि घेतला आहे,त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कुठलेही नोटीस न देता रातोरात कामावरून काढून टाकले आहे.आणि जे कर्मचारी राहिले आहेत त्यांना पगार देण्याची कुठलीही एक तारीख नक्की नाही.
अक्षरशः नोकरदार वर्गाचा या सर्व गळचेपीमुळे जीव मेटाकुटीला आला आहे.इकडे आड तिकडे विहीर या परिस्थितीत नोकरदार अडकले आहेत.आवाज उठवून कुणाला सांगतील नाहीतर आहे ती पण नोकरी जायची.आणि नोकरदारांच्या याच मजबूरीचा फायदा काही खाजगी कंपन्या या महामारीच्या काळात घेत आहेत.बरेच कर्मचारी हे निराशेच्या आहारी गेले आहेत आणि त्यांना डिप्रेशन नावाचे वेगळे आजार हि जडू लागलेत.
या सर्व परिस्थितीत स्वतःची काळजी घेऊन आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी सामान्य माणसाला घराबाहेर पाडण्याशिवाय पर्याय नाही.आणि गेलेली नोकरी,खाजगी कंपन्यांचे आडमुठेपणा,पगार मिळेल कि नाही,आपल्या मुलांचे,कुटुंबाचे कसे होईल आणि ही महामारी कधी संपेल या विवंचनेत माणूस एक एक दिवस ढकलत आहेत.







