मुंबई (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ यांच्यातर्फे आझाद मैदान मुंबई येथे त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. दिनांक १५ डिसेंबर रोजी.मुख्यमंत्री परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यांचा त्वरित विचार करावा व आमची रोजी रोटी सुरू करावी.अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल. विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या सभासदांच्या स्कूल बस ना वाहतुकीची परवानगी द्यावी जेणेकरून लोकांना चांगली सुरक्षित सेवा मिळेल. अद्याप लोकल वाहतूक सर्व सामान्यांना साठी सुरू झालेली नाही त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल गर्दी टाळता येईल प्रवाशांची लूटमार व गैरसोय दूर होईल







