मुंबई (प्रतिनिधी) – बीसीसीआयने उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लड या दोन संघामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. अजून दोन कसोटी सामने अहमदाबाद होणार आहेत. उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली.
पहिला कसोटी सामना इंग्लडच्या संघाने जिंकला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय संपादन केला. उर्वरित दोन कसोटी सामन्यात उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दोन कसोटी सामने खेळलेल्या मराठमोळ्या शार्दुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयने हि माहिती ट्विट करुन दिली आहे.
वेगवान गोलंदाज उमेद यादव हा दुखापतग्रस्त असला तरी तो थेट अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. तो दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे की नाही याची वैद्यकीय मितीकडून माहिती घेतल्यानंतरच त्याचा संघात समावेश करण्यात येणार आहे. तो संघात आला तरच ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुलला भारतीय संघातून सोडण्यात येईल. त्यानंतर तो विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
भारतीय कसोटी संघ
विराट कोहली ( कर्णधार ), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), के.एल. राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्निन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज






