मुंबई (संदेश काटकर)– देशात सध्या कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्याची काही प्रमुख कारणे केंद्र सरकारने सांगितली आहेत. मागच्या महिन्यात केंद्र सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीत हि कारणे समोर आली होती.
त्यातील प्रमुख कारण आहे मास्क न लावणे. बहुतांश लोक मास्क वापरणे पसंत करत नाहीत. मास्क लावला तरीही नाक मास्कने झाकलेलं नसते. दुसरे महत्वाचे कारण आहे सोसिअल डिस्टंसिन्गचे पालन न करणे. लोक बाजार, दुकाने, मॉल आदी सर्वत्र गर्दी करतात. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाहीत. दो गज कि दूरी सोडा, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गाड्या खचाखच भरलेल्या असतात. हि कोरोना वाढण्याची प्रमुख करणे आहेत.






