सायन, वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत केले आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मुंबई, उपनगर व वसई-विरार भागात वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्र खवळला; मरिन ड्राइव्ह येथे आज उंच लाटा उसळल्या
#WATCH | Rain continues in parts of Mumbai. Visuals from Marine Drive#Maharashtra pic.twitter.com/4GyGlu22uG
— ANI (@ANI) July 21, 2021
मुंबईः चेंबूरमध्ये मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचले; पाण्यातून मार्ग काढण्यात अडचणी
#WATCH | Several parts of Mumbai face waterlogging as the region continues to receive rainfall. Visuals from Chembur. pic.twitter.com/HiCH9bUjxR
— ANI (@ANI) July 21, 2021
मुंबईः सायन, वडाळा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra: Heavy rainfall continues to lash Mumbai, visuals from Wadala.
As per India Meteorological Department's (IMD) forecast, Mumbai will experience 'generally cloudy sky with heavy rain' today. pic.twitter.com/E2gzAd3CmE
— ANI (@ANI) July 21, 2021
पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.






