सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी – दिव्या भोसले

मुंबई (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेकरिता अर्जाची मुदत संपली आहे. सीबीएसईचा निकाल उशिराने जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी वंचित राहिले. त्यामुळे सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, की यासंदर्भात राज्यातीलभरातील पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आदरणीय आमदार रोहित दादा पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्वीय सचिव विजय भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केले. त्यांना याबाबत अवगत केले. आगामी काळातही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here