इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : शहरांतील प्र.२८,२९,३० यांसह परिसरांतील पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच या भागांमध्ये पाण्याच्या टाकीचे नियोजन करावे, अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक मोहन कुंभार, नगरसेवक रवि लोहार, पै.अमृत भोसले, अजय जावळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
सोमवारी दि.११ ऑक्टोंबर रोजी उपनगराध्यक्ष दालनात इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांनी पाणी पुरवठा विभागांतील अभियंता बाजी कांबळे यांना बोलावून संदर्भीय निवेदनांवर सर्व भागांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्त निर्देश दिले. यावेळी माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी नियोजनबद्धरित्या पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनावर करण्यात येणारे आमरण उपोषण मागे घेतले.
सदर बैठकीत माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निखील जमाले, आलिशा आवळे तसेच परिसरातील नागरिक यांची उपस्थिती होती.