मुंबई (संपादक सुनिल पाटील) : २५ डिसेंबर श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती अन्नवस्त्र दान रुपी साजरी करण्यात आली.
मुंबई स्थित वेद फाऊंडेशन द्वारा शतकातील या महान नेत्याला स्मरत मुंबई उपनगरातील कांदिवली भागात रहिवासी असणाऱ्या वयोवृद्ध तथा अनाथ बालकांना ब्लॅंकेट आणि एक दिवसीय पौष्टिक आहार वितरित करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका सौ मंजू सराठे, सौ सोनाली गांधी, साई परिवार अध्यक्षमंगेश रासम, अंकुश रासम यांच्यासमवेत नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार विशेष उपस्थित होते.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे अनेकांचे श्रद्धास्थान होते यांच्या जयंतीनिमित्त गरजू व्यक्तींना अन्नदान आणि वस्त्रदान करणे श्रेयस्कर ठरते असे प्रतिपादन कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला विभागातील ज्येष्ठ मान्यवरांच्या संकल्पनेतून आजचा अन्नदान तथा वस्त्र दानाचा सोहळा सर्व शासकीय नियमांचे पालन करीत पार पडला.