कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला – कुबेर जाधव

कार्यकर्त्यांचा आधारवड

महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा आज हरपला आहे, महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान आज दादांच्या जाण्यानं झालं, महाराष्ट्रातील राजकारणातील दादा माणूस गेला, गेली चार दशके महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटातील हुकमी एक्का गमावला आहे, अजित दादांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला चटका लावून गेली आहे.

बारामतीचा विकास आणि बारामतीचे जडणघडण अजित पवार यांनी केली, कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी, हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले,हो तंर हो नाही तर नाही*असं ठामपणे मांडत होते,नियतीच्या घड्याळाची वेळ नक्कीच चुकली अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना अचुक ओळखुन त्यांचं समाधान होईल असे भाकीत व्यक्त करणारं व्यक्तीमत्व हरपल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत दमदार आणि दिलदार नेता गमावला आहे, ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे, महाराष्ट्राने एक पावरफुल पांवरहाउस गमावलं, अजित पवार यांच्या हातात असलेल्या गोल्डन घड्याळा मुळे त्यांची ओळख पटली,द्रुष्यमानता (व्हिजिबिलीटी) कमी असल्याचे अपघाताचे प्रमुख कारण सांगितले जाते आहे. अपघाताची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे प्रशासनावर प्रचंड पकड आणि दबाव असलेला नेता गमावला आहे, खेड्यापाड्यातील जनतेची अचूक माहिती असलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत.
आज महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला गोरगरीब रयतेचा कैवारी आज आपल्यातून निघून गेला, चंद्र तारे आहेत तोपर्यंत माननीय अजित दादा पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत राहील, असेही आपल्या शोकसंदेशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here